Skip to content

Menu

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress

नंबर १ मराठी न्यूज
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा
You are here :
  • Home
  • महाराष्ट्र
  • Navi Mumbai Airport : नवीमुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव! प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे ‘हे’ लोकनेते यांची माहिती
Written by October 3, 2025

Navi Mumbai Airport : नवीमुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव! प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे ‘हे’ लोकनेते यांची माहिती

महाराष्ट्र Article

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अखेर लोकनेते दिनकर बाळू पाटील (दि. बा. पाटील)  यांचे नाव देण्याचा निर्णय निश्चित झाला आहे.

 Navi Mumbai Airport Naming Confirmed:  मुंबईसह महाराष्ट्रासाठी एक नवी ओळख ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अखेर लोकनेते दिनकर बाळू पाटील (दि. बा. पाटील)  यांचे नाव देण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. या महत्त्वाच्या विषयावर नुकत्याच झालेल्या बैठकीत सहमती झाली असून, याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नामकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सकारात्मक आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त आणि कष्टकरी जनतेचे आधारस्तंभ असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव या जागतिक दर्जाच्या विमानतळाला दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रमुख मागणी आणि कारण : लंडनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाशी तुलना होत असलेल्या या भव्य विमानतळाचे लोकार्पण याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमीपुत्रांकडून या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपूत्रांसाठी  अनेक दशके संघर्ष केलेल्या या लोकनेत्याच्या कार्याचा गौरव व्हावा, ही स्थानिकांची तीव्र इच्छा होती. अखेर ही मागणी मान्य झाल्यामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमधील प्रकल्पग्रस्त आणि कष्टकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 लोकनेते दि. बा. पाटील  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्यांचे नाव दिले जात आहे, ते दिनकर बाळू पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील जासईमध्ये 13 जानेवारी 1926  रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक आणि शेतकरी होते. पुण्यामध्ये वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात आणि हळूहळू राजकारणात प्रवेश केला. शेतकरी कामगार पक्षातून (शेकाप) त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

त्यांनी पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले, पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघातून ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच, त्यांनी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले होते. रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी 2 वेळा केले. राजकारणाबरोबरच ते एक उत्तम वक्ते होते आणि त्यांना राज्य सरकारचा पहिला उत्कृष्ट वक्ता पुरस्कार मिळाला होता. 1999 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, मात्र वृद्धापकाळामुळे ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

प्रकल्पग्रस्तांसाठी उभारलेला लढा आणि ‘साडेबारा टक्के’ तत्त्व : दि. बा. पाटील यांची खरी ओळख म्हणजे सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची उभारणी होत असताना त्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेला निर्णायक लढा. सिडकोने भूसंपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांच्यात संतापाची लाट पसरली होती. या असंतोषाला योग्य दिशा देत दिबांनी मोठा लढा उभारला. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि देशभर गाजलेल्या 1984 च्या लढ्यातूनच शेतकऱ्यांना संपादित जमिनीच्या मोबदल्यात 12.5% (साडेबारा टक्के) विकसित जमीन देण्याचे तत्त्व प्रस्थापित झाले. हे तत्त्व नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले.

प्रकल्पग्रस्त, कष्टकरी शेतकरी, आगरी आणि कोळी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या या कार्यामुळेच नवी मुंबई ही त्यांची कर्मभूमी मानली जाते. त्यांच्या या योगदानाची नवी पिढीला प्रेरणा मिळावी आणि त्यांची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरला होता.

You may also like

Nashik : नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला

November 26, 2025

Nashik City News : वृक्ष वाचवण्यासाठी किंबहुना ऑक्सिजन वाचवण्यासाठी आलिंगन आंदोलन.

November 26, 2025

Nashik City News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर 14 वर्ष लैंगिक अत्याचार, 50 लाखांची आर्थिक फसवणूक भोंदू बाबा अद्यापही फरार

November 23, 2025
Tags: Mumbai

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress